Friday 30 March 2018

*पूर्वीचा काळ बाबा*
*खरंच होता चांगला*
*साधे घरं साधी माणसं*
*कुठे होता बंगला ?*
*घरं जरी पत्र्याचे पण*
*माणसं होती मायाळू*
*साधी राहणी चटणी भाकरी*
*देवभोळी अन श्रद्धाळू*
*सख्खे काय चुलत काय*
*सगळेच आपले वाटायचे*
*सुख असो दुःख असो*
*आपुलकीने भेटायचे*
*पाहुणा दारात दिसला की*
*खूपच आनंद व्हायचा हो*
*हसून खेळून गप्पा मारून*
*शीण निघून जायचा हो*
*श्रीमंती जरी नसली तरी*
*एकट कधी वाटलं नाही*
*खिसे फाटके असले तरीही*
*कोणतंच काम रुकलं नाही*
*उसनं पासनं करायचे पण*
*पोटभर खाऊ घालायचे*
*पैसे आडके नव्हते तरीही*
*मन मोकळं बोलायचे*
*कणकीच्या उपम्या सोबत*
*गुळाचा शिरा हटायचा*
*पत्राळ जरी असली तरी*
*पाट , तांब्या भेटायचा*
*लपणा झपणी धप्पा कुटी*
*बिन पैशाचे खेळ हो*
*कुणीच कुठे busy नव्हते*
*होता वेळच वेळ हो*
*चिरेबंदी वाडे सुद्धा*
*खळखळून हसायचे*
*निवांत गप्पा मारीत माणस*ं
*वसरीवर बसायचे*
*सुख शांती समाधान " ते "*
*आता कुठे दिसते का ?*
*पॉश पॉश घरा मधे*
*" तशी " मैफिल सजते का ?*
*नाते गोते घट्ट होते*
*किंमत होती माणसाला*
*प्रेमामुळे चव होती*
*अंगणातल्या फणसाला*
*तुम्हीच सांगा नात्या मध्ये*
*राहिला आहे का राम ?*
*भावाकडे बहिणीचा हो*
*असतो का मुक्काम ?*
*सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी*
*कुणीच कुणाला बोलत नाही*
*मृदंगाच्या ताला वरती*
*गाव आता का डोलत नाही*
*प्रेम , माया , आपुलकी हे*
*शब्द आम्हाला गावतील का ?*
*बैठकीतल्या सतरंजीवर*
*पुन्हा पाहुणे मावतील का ?*
*तुटक तुसडे वागण्यामुळे*
*मजा आता कमी झाली*
*श्रीकृष्णाच्या महाला मधुनी*
*सुदामाची सुट्टी झाली*
*हॉल किचन बेड मधे*
*प्रदर्शन असतं वस्तूंचं*
*का बरं विसर्जन झालं*
*चांगुलपणाच्या अस्थीचं ???*

Thursday 29 March 2018

*अशीच यावी वेळ एकदा*
अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना
उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक
मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर
मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा
संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे
तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना
हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला
सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये
शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले

Wednesday 28 March 2018

गृहिणीची अचिव्हमेंट
मी घरीच असते.हे अगदी हलक्या आवाजात ती
म्हणाली…
माझं उत्तर, अरे व्वा मस्तच!!
काय मस्तच ग ?लाज वाटते मला,एवढं उच्च शिक्षण घेऊन, मी गृहिणी आहे सांगायची.
हल्ली सगळीकडे हा संवाद ऐकायला मिळतो.
स्वत:ला गृहिणी म्हणून जगायला लाज कशासाठी वाटायला हवी.आपली संस्कृती ,आपले संस्कार,आपले विचार,आचार व्यक्त करण्यासाठी तुम्हाला किती तरी वेळ मिळतो.आता वेळ नाही ही सबब प्रत्येक जण पुढे करते.तस काहीही नाही.स्वत:साठी
वेळ काढणे,त्याचा योग्य तो वापर करून स्वत:ला
व कुटूंबाला आनंदी ठेवणे , तुमच्याच हातात आहे.
तुमच्या कडे गृहिणीपद आहे,यात किती तरी गोष्टींचा आनंद घेऊ शकता.लग्न झाल्यानंतर हळूवारपणे बाळाची चाहूल लागते.त्या क्षणाचा आनंद घेत,त्याच्या गर्भातील हालचालींचा सुखद अनुभव.त्याच्या जन्मानंतर त्या बाळाची रोज होणारी प्रगती, पालथं पडणं,रांगणे, हळूहळू पाऊल टाकणे.आंघोळ
घालताना पाणी बघून त्याच्या डोळ्यात दिसणारा आनंद . हळूवार पावलांचा आवाज,त्याच्या तळव्यांचा स्पर्श.हे क्षण सहजासहजी नाही मिळत.हे उपभोगण्यासाठी तेवढा वेळ ही महत्त्वाचा आहे.
मुलं मोठी.व्हायला लागतात,मग त्यांचे खाणे पिणे, आवडीचे पदार्थ तयार करून खायला घालणे.खुप आवडता पदार्थ आईने केला की शाळेतून आल्यावर
प्रेमाने मारलेली मिठी.आवडती डिश खाताना शाळेत घडलेल्या गमतीजमती.कुणा मित्राची झालेली फजिती,ते सांगतानाच आलेलं खळखळत हसू.खरच सांगा सख्यानो हे सुख दहा तास नोकरी करताना मिळू शकते का ? शाळेच्या रोजच्या दैनंदिनीत इतक्या घटना घडतात की त्यांना घरी आल्याबरोबर ते ऐकायला एक हक्काचा श्रोता हवाच असतो.
या गोष्टी फक्त मुलांच्या बाबतीतच नाही तर,आपला जोडीदार,पती ,त्यालाही तेवढा वेळ देणे,त्याच्या सोबत वेळ घालवणे.संधी मिळेल तेव्हा विविध विषयावर चर्चा करणं हे देखील आनंददायी आहे.गृहिणी आहात म्हणून दुसरं काही करता येत नाही, असे नाही ना! तुम्ही आवडीच्या विषयावर वाचन करणे.चित्रपट बघणे, विणकाम ,भरतकाम, लिखाण करणे.एखाद्या आवडत्या छंदाचे अर्थार्जनात रूपांतर करणे.मुलांच्या वेळेप्रमाणे सामाजिक कार्यात सहभागी होणे.व्याख्यानम
ाला ऐकायला जाणं.चित्रप्रदर्शन बघणं.स्वत:ला सतत कार्यरत ठेवा.जगातील, देशातील, स्थानिक घडामोडींवर सतत अपडेट राहणं, जेणेकरून मुलांशी, पतीशी,व इतरांशी संवाद साधताना आपले व्यक्तिमत्त्व खुलले पाहिजे.
गृहिणी म्हणून जगाताना मी पैसे कमवू शकत नाही म्हणून न्यूनगंड बाळगू नका.घरी राहिल्याने या सुखद क्षणांचा आस्वाद आपण घेऊ शकतो,हे लक्षात ठेवा.
पैसा कमावणे म्हणजेच जीवन सार्थकी लागते असे नाही ना.आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी करणे हाच नाही,तर तुम्ही उच्चशिक्षित असल्याने तुमच्या कुटुंबाला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकता.हे कायम लक्षात ठेवा.हे आनंदाचे क्षण तुमच्या हृदयाच्या तिजोरीत जपून ठेवा,ती तुमच्या आयुष्यभराची साठवण आहे.तेव्हा अभिमानाने सांगा मी गृहिणी आहे......

Tuesday 27 March 2018

भूक....
किती प्रकारची
कधी खपाटीला गेलेलं पोट
तर कधी ताटावर खिळलेली नजर
कधी अगदीच मंद झालेली हालचाल
तर कधी आधाश्यासारखं खाणं......
दाखवते भूक . . . .
.
.
.
.
.
कधी अत्यंत लोचट नजर
पैशांसाठी सदैव हपापलेले हात
अत्यंत निर्लज्ज असं वागणं बोलणं
तर कधी पैशासाठी कुठल्याही थराला जाणं........
दाखवते भूक . . . .
.
.
.
.
.
कधी अत्यंत जिज्ञासू ज्ञानपिपासू वृत्ती
डोळ्यांना लागलेला भिंगाचा चष्मा
पानांवरून झरझर फिरणारी नजर
बोलतानाही बोटं दोन पानात अडकलेली.......
दाखवते भूक . . . . .
.
.
.
.
.
.
कधी पायाला बसलेली घट्ट मिठी
तर्जनी पकडायला धावणारा हात
तर कधी कडेवर बसण्यासाठी पसरलेले हात
डोळ्यांमधे खचाखच भरलेलं आर्जव.......
दाखवते भूक . . . . .

Monday 26 March 2018

जे मनापासुन केले तरी भेटत नाही,
कदाचित ते खरे प्रेम असते.....
मनात असुन पण जे व्यक्त करता येत नाही,
कदाचित ते खरे प्रेम असते.....
लांब जाऊन पण जे नेहमी आठवत ते ,
बोलताना पण नकळत जे डोळ्यातुन आश्रु आणत .....
कदाचित ते खरे प्रेम असते.....
आपल्या सोबत भांडताना,पण ?????
आपल्यावर हक्क सांगते,
कदाचित ते खरे प्रेम असते.....
जे मनातुन रडुन पण आपल्याला हसवते,
डोळे बंद केले तरी,मनात दिसते .....
कदाचित ते खरे प्रेम असते.....
जे मनापासुन हव असताना कधीचं मिळत नाही,
आणि ज्याना मिळत त्याना ते टिकवता येत नाही .....
कदाचित ते खरे प्रेम असते.....!!

Sunday 25 March 2018

माझ्या व्याख्याच वेगळ्या आहेत *'श्रीमंती'* च्या.
.
.
बघा, पटतात का तुम्हाला !
.
.
घरात दररोज ताजी फळं/फुलं/भरपूर दूध/दही असणं म्हणजे... *'श्रीमंती'*.
.
.
.
आज अवचित पाहुणा दारात आला आणि मी त्याला पोटभर जेवू घालू शकले तर,
...मी *'श्रीमंत'* आहे.
.
.
माझी सहज आठवण आली म्हणून एखाद्या मित्रमैत्रिणीचा, नातेवाईकाचा फोन आला तर,
...मी *'श्रीमंत'* आहे.
.
.
कुणीतरी अडचणीत आहे,
मदतीसाठी माझी आठवण आली तर,
...मी नक्कीच *'श्रीमंत'* .
.
.
कुणाचे तरी विश्वासपात्र असणे म्हणजे... *'श्रीमंती'* .
.
.
भर उन्हात फुललेला गुलमोहोर/फुललेली झाडे दिसावी म्हणजे... ...नजरेची *'श्रीमंती'*.
.
.
.
थंडीत मस्त फुले अंगणभर पडावीत तर कधी पारिजातकाचा सडा, सोनचाफ्यांची फुले पडावी आणि त्यांच्या सुगंधानें सबंध अंगण भरून जावं ही *'श्रीमंती'*.
.
.
थंडीच्या गारठ्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुक्यात फुलांचा सुगंध तृप्त, मदमस्त करून जावा,
...हीच *'श्रीमंती'*.
.
.
.
होय. मला अशीच *'श्रीमंती'* हवी आहे.
.
.
.
अशी *'श्रीमंती'* आपल्यालाही लाभावी.
.
.
.
असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात यावेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आनंदाने जगता यावेत .
.
.
.
आपल्या आसपास भरपूर माणसं असावीत आणि आपण खरंच या अर्थाने *'श्रीमंत'* व्हावे.
.
.
.
*'श्रीमंती'* म्हणजे समाधान.
...समाधानात *'श्रीमंती'*.

Saturday 24 March 2018

अप्रतिम कविता
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते....
वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात....
अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते....
सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव....??
विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी....
शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे....
गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....
थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....
ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं....
भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं....
नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते....!!
Really heart touching. ...

Friday 23 March 2018

अंड्या मध्ये प्लास्टिक...
तांदळामध्ये प्लास्टिक...
बिसलरी मध्ये प्लास्टिक...
खव्या मध्ये भेसळ...
दुधात पाण्याची भेसळ...
भाजी पाल्यात गटाराचे पाणी,
कलिंगड खावे तर कलर चे इंजेक्शन,
डाळिंबाच्या ज्युस मध्ये साकारीन ची भेसळ,
चॉकलेट मध्ये किडे,
चिकन खावे तर इंजेक्शन मारून कोंबडी फुगवलेली,
मच्छी खावी तर ताजी चा पत्ताच नाही,
मटन खावे तर कुत्री कापलेली,
पाणी पुरी खावी तर मुतलेला भय्या हातात लोटा पकडून,
वडा पाव खाल्ला तर वड्या मध्ये झुरळ,
मेकअप करावी तर डुप्लिकेट मटेरियल,
गाडीत डिझल भरावे तर पंप वाले कट मारतात,
पेट्रोल भरावे तर रॉकेल ची भेसळ,
बँकेत पैसे ठेवावे तर कोणतरी घेऊन पळतो,
बँकेतून पैसे काढले तर टॅक्स लागतो,
पैसे जास्त जमा केले तर विचारतात आले कुठून,
जमीन विकली तर बिल्डर पळतो,
स्वतःच्या जमिनीवर घर बांधले तर पालिका तोडते,
प्रेम करावे तर Gf चे घर वाले धुवतात,
लग्न करावे तर नोकरी नाही,
कंटाळा आला म्हणून 10 मिनिटे घरा बाहेर बाईक वर पडलो तर हेल्मेट नाही म्हणून 500 रुपये दंड.
प्लॅट फॉर्म वर मित्रा ला सोडायला गेलो तर 500 रुपये दंड.
शाळेत ऍडमिशन ला गेलो तर आधार कार्ड नाही म्हणून प्रवेश बंद.
60 वर्षा वरील म्हाता-या आजोबाला ST चा प्रवास मोफत पण बस स्थानकावर 4 पावले आजोबा मागे उभे राहिले तर ड्रायव्हर बस थांबवत नाही.
मेहनत करून पोलिसात भरती व्हावे तर दिवस भर उन्हात उभे राहा.
RTO मध्ये भरती व्हावे तर धूळ खात मरा.
आयुष्य भर इमानदारीत नोकरी करावी तर PF खाऊन पळतो मालक.
यात्रा पालखी मध्ये थोडा वेळ नाचावे तर बेवड्याला सोडून पकडतात पोलीस.
2 दिवस देवदर्शनाला जावे तर घरदार साफ करतात चोर.
निवडणूक जवळ आल्यावर पाया पडतात नेते, निवडून आल्यावर बघत पण नाही खोटे.
फेरीवाले झालेत गल्लो गल्ली जाम
चालून देत नाही जनतेला सरेआम.
कच-याने झाली सामान्य जनता बेहाल.
15 लाख देण्याचे दिले त्यांनी वचन
सत्ता संपत आली आत्ता भूल जाए वतन...!
सरकार माय बापा जगू तरी कसे?
तुम्हीच सांगा मी तुम्हाला मत देऊ तरी कसे???

Thursday 22 March 2018

गावात रेंज असो वा नसो,
चेंज मात्र नक्की झालाय,
कनेक्टीव्हीटी वाढली पण,
माणुस माणसापासुन दुर गेलाय.....
गावागावात उभे झाले,
राजकारणाचे टाॅवर,
भाऊच भावाला दाखवतो ,
राजकारणाची पाॅवर.......
इथेही झळकतात शुभेच्छांचे,
मोठ्मोठाले बॅनर,
गावच्या समस्या शोधण्याचा,
नाही कुणाकडेच स्कॅनर.....
इथेही दिसतो प्रत्येक,
तरुणाच्या हाती स्मार्ट फोन,
तसाच का दिसु नये ?
उन्नतीचा स्मार्ट दृष्टीकोन.....
वायफाय सारखी कनेक्ट व्हावी,
माणसे इथली सगळी,
गाव एडीट करण्याची,
शक्कल लढवावी आगळी.......
एडीट करून व्हाट्सअप चे डिपी सजवतो ,
तसे एडीट करून सजवावे गाव,
फेसबुक व्हाट्सअप च्या वाॅलवरही मग,
तुमचाच वाढेल भाव......

Wednesday 21 March 2018

जगण्याचा 'अनपेक्षित' मार्ग"
कधी कधी जीवनात आपण विचार करतो एक आणि होते एक " ह्या वाक्क्याचा सर्रास उपयोग आपण करीत असतो फक्त वाक्या समोर उगीचच "कधी कधी "असा शब्द लावतो, प्रत्यय मात्र रोजच येतो. का होत असेल असे याचा कधी आपण विचार करीत नाही किंवा तेवढा वेळ आपल्याजवळ नाही आहे. पण कधी थोडा थांबलात व शांतपणे विचाराधीन झालात तर मग मात्र हि उकल होईल. आपण प्रत्येक जण कोणातरी कडून काहीतरी अपेक्षा करीत असतो. आपली जशी इच्छा आहे तसे घडले पाहिजे अशी अवास्तव अपेक्षा बाळगून आपण जगत असतो. आपल्या सभोवती असलेल्या जीव व अजीवाकडून सुद्धा. अगदी बेभान होऊन जसे काही आपण या जगाचे मालक आहोत. ज्याने त्याने आपल्या मनासारखे वागले पाहिजे, आईवडील, बहीण भाऊ, पत्नी मुले, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, ग्राहक , दुकानदार, सरकार, संस्था, इत्यादि इत्यादी. केवढा हा अट्टाहास, त्यांचे गृहीतके काय आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते आणि जेंव्हा या सर्वांकडून तुमच्या अपेक्षेची उपेक्षा होते तेंव्हा मात्र स्वतःच आत्मपरीक्षण न करता नुसता संताप व्यक्त होतो व तोंडातून वाक्य निघते , " अरे यार काय हे जीवन , मी काय विचार केला होता आणि हे काय झाले....!
जीवनात कोणाही कडूनच कोणतीच अपेक्षा ठेऊ नका. कुठलंच गृहीत करू नका, कुणावर कुठलंच बंधन टाकू नका, जेवढं सहज अन नैसर्गिक जगता येईल तेवढं जगा. बिनधास्त टाकून द्या निसर्गावर तुमच्या अपेक्षा. घडू द्या सर्व अनपेक्षित, जे जस होईल तस होऊ द्या. विश्वास ठेवा, पहा त्यातून निर्माण होईल तो आनंदच, समाधानच. उपेक्षा होणारच नाही तर मनस्तापही नाही. कोणतेच बंधन घालू नका मनावर कोणाच्या अपेक्षेचे, इच्छेचे, नात्याचे, जबाबदारीचे , निरंक, निर्मळ, निर्भेळ रहा. आशावादी रहा, सकारात्मक रहा हिच खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे, जगण्याचा सोपा आणि " अनपेक्षीत " मार्ग सुद्धा...

Tuesday 20 March 2018


एखादी स्ञी राञी 12 नंतर Online राहत असेल तर ती एवढया राञी online का राहते?........... मोठ्ठा प्रश्न (?) ........
( मग हिला हिच्या घरातले कोणी काही म्हणत नाही का?...... हिच्या घरामधे काही problem असेल का?...... तिचा नवरा तिला काही म्हणत नसेल का?...... कि हिचं नव-याशी जमतंच नसेल, कि आणखी काही problem असतील..... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असातात)
एखादी स्ञी जर प्रेम कविता लिहित असेल तर ....... Big question?(?) ....
( तिचं कोणावर प्रेम आहे का? ....... तिला कोणी आवडतो का? ....... किंवा तिचा कोणी प्रियकर आहे का?..... असेल तर लग्ना आधीचा आहे कि लग्नानंतरचा?...... आणि नसेल तर ही अशी लिहिते....वैगरे वैगरे .... हे आणि असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात
एखादी स्त्री जर फेसबुकवर आपले विविध फोटो टाकत असेल तर ........ अतिशय मोठा प्रश्न (?)
( ही असे स्वतःचे फोट टाकत का असते?????,.... हिला काय दाखवायचं असतं?...... हिचं हे वय आहे का?..... ही अशी का वागते?...... वैगरे वैगरे असे अनेक उपप्रश्न लोकांना पडलेले असतात )
तर या सर्व प्रश्नाच एकच उत्तर ते म्हणजे, जरी ती एक स्त्री असली तरी ती एक माणूस आहे..... तिला तिच्या मर्जी प्रमाणे जगण्याचा संपुर्ण अधिकार आहे...... तिला ज्या ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या त्या गोष्टी ती करते ......... आणि तिला ते जमतं देखील ...... तिच्या अश्या वागण्या मागे काही कारण असतचं असं नाही ........ कोणीही एखादी व्यक्ती असो त्याला अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो...... तुम्हांला जर जमत असेल तर तुम्ही पण या गोष्टी करा आणि जमत नसेल तर, उगीचच तिच्यावर "असंस्कारक्षम" असल्याच लेबल लावू नका...... एवढंच...

Monday 19 March 2018

एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"
"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.
इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?
बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.
विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.
तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.
कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत.
तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, "व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास”, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.
विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.
साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?
आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."
पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."
दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"
पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय.
पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."
भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.
सोऽहं शिवोहं !!
शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला लागू तेव्हा मग आणखी समजण्यासारखं राहिलंच काय? होय ना?

Saturday 17 March 2018


ज़िन्दगी की आपाधापी में,
कब निकली उम्र हमारी,
*पता ही नहीं चला।*
कंधे पर चढ़ने वाले बच्चे,
कब कंधे तक आ गए,
*पता ही नहीं चला।*
किराये के घर से
शुरू हुआ सफर,
अपने घर तक आ गया,
*पता ही नहीं चला।*
साइकिल के
पैडल मारते हुए,
हांफते थे उस वक़्त,
अब तो
कारों में घूमने लगे हैं,
*पता ही नहीं चला।*
हरे भरे पेड़ों से
भरे हुए जंगल थे तब,
कब हुए कंक्रीट के,
*पता ही नहीं चला।*
कभी थे जिम्मेदारी
माँ बाप की हम,
कब बच्चों के लिए
हुए जिम्मेदार हम,
*पता ही नहीं चला।*
एक दौर था जब
दिन में भी बेखबर सो जाते थे,
कब रातों की उड़ गई नींद,
*पता ही नहीं चला।*
बनेंगे कब हम माँ बाप
सोचकर कटता नहीं था वक़्त,
कब हमारे बच्चे बच्चों वाले होने योग्य हो गए,
*पता ही नहीं चला।*
जिन काले घने
बालों पर इतराते थे हम,
कब रंगना शुरू कर दिया,
*पता ही नहीं चला।*
होली और दिवाली मिलते थे,
यार, दोस्तों और रिश्तेदारों से,
कब छीन ली प्यार भरी
मोहब्बत आज दे दौर ने,
*पता ही नहीं चला।*
दर दर भटके हैं,
नौकरी की खातिर ,
कब रिटायर होने का समय आ गया
*पता ही नहीं चला।*
बच्चों के लिए
कमाने, बचाने में
इतने मशगूल हुए हम,
कब बच्चे हमसे हुए दूर,
*पता ही नहीं चला।*
भरे पूरे परिवार से
सीना चौड़ा रखते थे हम,
कब परिवार हम दो पर सिमटा,
*।।। पता ही नहीं चला ।।।*

Friday 16 March 2018

सगळे घेतात माझ्या
सुख-दुःखाची दखल
एक तू सोडून...
खरचं इतका दूर
गेलास काय रे
सगळेच धागे तोडून...?
जग जवळ आलंय म्हणे
अन् अनोळखीही झालेत ओळखीचे
तुझा मात्र पत्ताच नाही
अन् तूच सांगायचा...
नातं आपलं शतजन्मीचे
वाढदिवसही वाटतो सूना
सुने झाले सण-समारंभ
तुझ्या शुभेच्छाविना
हरवलाय जगण्यतला आनंद
गेलोय आपण एकमेकांपासून
खूप दूर....
तरीही मन हेलावतं
जेव्हा येतो... तुझ्या आठवणींचा पूर
नसेल तुला चिंता माझी...
नसूदे... तक्रार नाही
मात्र तुझी खुशाली कळव
तुझं-माझं नातं एकदा तरी आठव

Thursday 15 March 2018


बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
माणुस मात्र आसवा,
अगदी जवळचा फक्त....!!
प्रेम करावं कुणावर,
त्याला सीमाच नसावी....
भावनाच इतकी गोडं,
जी अखंड जपावी...!!
रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
फार काळ टिकु नये,
असावा एखादं घटका....!!
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त...!!
कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
झालाचं जर कधी,
चुकून एखादं भांडण...!!

Wednesday 14 March 2018


*सात कोड्यांना आई ने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे*

*या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??*
*मुले म्हणाली ,तलवार...*
*आईने सांगितले.. जीभ..*
*कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसर्याचा अपमान करतो, दुसर्याला दुखावतो, दुसर्याच्या भावनांना धक्का पोचवतो.*
*या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??*
*एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...*
*आई म्हणाली...भूतकाळ.*
*माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणार्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.*
*या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???*
*दुसर्याने सांगितले की, पृथ्वी, पर्वत, सूर्य.*
*आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे..हाव.*
*लोक दुःखी होतात त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.*
*पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???*
*तिसर्या ने उत्तर दिलं... पोलाद, लोखंड, हत्ती.*
*आई म्हणाली, सगळ्यात कठिण वस्तू... वचन.*
*वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.*
*पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??*
*चौथा म्हणाला .. कापूस, हवा, धूळ, पाने.*
*आई म्हणाली, सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.*
*पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणार्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.*
*पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???*
*पाचव्याने सांगितले, आई, वडिल, मित्र, नातेवाईक.*
*आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे 'मृत्यू'.*
*कारण कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.*
*शेवटचा प्रश्न..*
*या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??*
*मुले म्हणाली खाणे, झोपणे, फिरायला जाणे.*
*आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*

Tuesday 13 March 2018


खरचं का रे तुला …….?
खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ? की माझ्या मनापर्यंत पोहचण्याइतका वेळचं तुला मिळत नाही ?
सकाळी उठताच तुझ्या हाती वृत्तपत्र असतं, मला मात्र किचन मधलं कामचं आधी दिसतं
हातात टीव्हीचा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो
मला मात्र सगळं आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो
सकाळच्या या गडबडीत कधीकधी मला कपभर चहाही मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
संध्याकाळी तू ऑफिस मधून दमून घरी येतोस, मलाही तुझ्या सारखच दिवसभर काम असत हे मात्र तू अगदी साफ विसरतोस.
रात्रीचा स्वयंपाक, सकाळची तयारी माझी नुसती धावपळ सुरु असते, स्वतःबद्दलही विचार करायला ही मला फुरसत कुठे असते ?
तक्रार नाही रे, पण सगळ मँनेज करताना मला पुरेशी झोपही मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
सुट्टीचा दिवस म्हणजे तुझ्या हक्काच्या विश्रांतीचा दिवस
असतो, मला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो.
त्यातचं पाहुणे, मित्र यांच येणं , तुझ्यासाठी गेट-टुगेदरची मजा असते, माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही ओवर टाईमची सजा असते
मला कधीच का हक्काची सुट्टी किंवा एखादी रजाही मिळत नाही खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
तू खूप काही मदत करावीस इतकी माझी अपेक्षाच नसते वाईट फक्त वाटतं जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते
मला वाटतं निदान तुला माझ्या कामाची , ते करण्यामागच्या
प्रेमाची जाणीव असावी, थोडी का होईना तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी दिसावी
समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्यानीच मला आनंद मिळत नाही, खरचं का रे तुला माझं मन कधीच कळत नाही ?
की माझ्या मनापर्यंत पोहचण्या इतका वेळच तुला मिळत नाही .....!
-एका पत्नीचं मन

Monday 12 March 2018


*"ए आई" आणि " अहो आई " विषयीची एक छान कविता...*
माहेरच्या मातीतली तुळस जोवर सासरच्या अंगणात रूजत नाही
तोवर तुलना होणारच दोघीमध्ये
ए आई आणि अहो आई।।
आईची गोष्टच वेगळी तिच्या कुशीतलं रोपटं ती हळुवार जपते
पण कर्तव्यदक्ष सुगृहीणी घडवण्यासाठी अहो आई कठोर वागते।।
जन्मदात्या आईची सर कोणालाही येणार नाही
पण तरी अहो आईचं आयुष्यातलं महत्व कमी होणार नाही।।
ताणल्याशिवाय तुटत नाही
अन् टाळी एका हातानं वाजत नाही
असं एकतरी घर दाखवा बघू
जिथं भांड्याला भांड लागत नाही।।
अहो आईचे अनुभव तिचे कष्ट याचे ठेवावे भान
म्हणजे घराच्या रंगमंचावर
होणारच नाही नाटक मानापमान।।
अहो आईचा मोठाच पाठींबा
घरादाराला त्याचाच आधार
मुलं तिच्याच स्वाधिन करून
आपण संभाळतो घरसंसार।।
माहेरची जाईजुई बहरून
सासरच्या मंडपावर चढते
ए आई इतकं मुलीचं कौतूक
अहो आई सुनेचंही करते।।
सर्व आया आणि सासवांनां समर्पित.....

Sunday 11 March 2018

वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली .प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला मात्र कोणीच नाव सांगितलं नाही .
सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले ,'आपला आजचा तास इथेच संपतो आहे पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो .
किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले .
" काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती .वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं .पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली .रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक सुंदर ललना उभी होती . मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का ? हो , मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल . गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली .वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो . सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन .
तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे . मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली .एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं . निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली .अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो ,त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल ....
'तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो .'
प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला .
प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले ," माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे ."
***** , निघ बाहेर वर्गाच्या ...

Saturday 10 March 2018


*महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटी बसची रंजक कहाणी*
_तिला कुणी एसटी म्हणतं… कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं… कुणाला ती प्राणाहून प्रिय आहे तर कुणी तिचा तिरस्कारही करतं मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे कुणीही नाकारु शकत नाही. आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लोकांची ने आण करण्याचं काम एसटी करते. खेड्यापाड्यात आजही लोक एसटी वाट पाहात थांबलेली दिसतात कारण वाहतुकीसाठी त्यांना आधार आहे फक्त एसटीचाच…एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास… असा नारा सरकारने दिला किंवा तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं मात्र आपल्याला तिचा खरा इतिहास माहीत आहे का? महाराष्ट्रातील पहिली एसटी केव्हा सुरु झाली? ती कोणत्या दोन शहरांमध्ये धावली? तेव्हा एसटीचं तिकीट नेमकं किती रुपये होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल किंवा नसेल पडला
*१ जून १९४८ रोजी पहिल्यांदा धावली एसटी*
महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता 1 जून 1948. आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नाव असलं तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होतं. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं एसटी महामंडळाचं नाव होतं. एसटी बस कुठल्या दोन शहरांमध्ये धावणार याची जशी तुम्हाला उत्सुकता होती तशी उत्सुकता त्यावेळच्या लोकांमध्येही होती. अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती. पहिली एसटी बस म्हणजे तिचा थाट विचारायला हवा का? किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक होते.
 *कशी होती पहिली एसटी बस?*
जी बस पहिली एसटी बस म्हणून धावली तिची बॉ़डी आजच्यासारखी लोखंडी नव्हती किंवा आतमध्ये अॅल्युमिनिअमचं कामही नव्हतं. ती एक लाकडी बॉडी होती आणि वरुन जे छप्पर होतं ते चक्क कापडी होतं. लाकडी बॉडी असलेल्या या बसची आसनक्षमता 30 होती. सकाळी ठिक 8 वाजता ही बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसचं तिकीट होतं अडीच रुपये.
*ठिकठिकाणी झाले जल्लोषात स्वागत*
अहमदनगर ते पुणे प्रवासाच्या दरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र आसनक्षमतेमुळे ते शक्य नव्हतं. ज्या गावांमधून पहिली एसटी जाणार होती त्या गावांमध्ये आजूबाजूच्या गावांमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनं तशी अभावानंच पहायला मिळणाऱ्या या दिवसांमध्ये लोकांना या गाडीचं अप्रूप वाटणं सहाजिक होतं.  गावागावांमध्ये लोक बसचं जल्लोषात स्वागत करत. नवीन वाहनं आणल्यावर आज आपल्याकडे सवासिनी त्याची पुजा करतात किंवा आजही एखाद्या गावात एसटीची सेवा सुरु झाली तरी अशी पुजा केली जाते. तेव्हाही गावागावांमध्ये सवासिनी पुजेचं ताट घेऊन उभ्या होत्या. एसटी गावात पोहोचली की तिची पुजा केली जाई.
*पोलीस बंदोबस्तात धावली पहिली एसटी बस*
पुण्यामध्ये शिवाजीनगरजवळच्या कॉर्पोरेशनपाशी या बसचा शेवटचा थांबा होता, मात्र त्यावेळी पुण्यात अवैध वाहतूक जोरात होती. राज्य महामंडळाची बस सुरु झाल्याने या अवैध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एसटीवर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारने गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली.
_येत्या 1 जून रोजी या घटनेला 70 वर्षे होतील. आजही त्याच निश्चयाने एसटी लोकांना गावोगावी पोहोचवण्याचं काम करत आहे._

Friday 9 March 2018

*ब्रेक्स*
     एका आवडलेल्या इंग्रजी व्हॉटस अप मेसेजचे स्वैर भाषांतर -

 एकदा फिजीक्सच्या टीचरने मुलांना प्रश्न विचारला.
" कारमधे *ब्रेक्स* का लावलेले असतात ? "

त्यावर निरनिराळी उत्तरे आली
" थांबण्यासाठी "
" वेग कमी करण्यासाठी "
" अपघात टाळण्यासाठी "

परंतू सर्वात चांगले उत्तर होते
" जास्त वेगाने जाता येण्यासाठी "
असे कसे ? जरा विचार करा.

जर तुमच्या कारमधे *ब्रेकच* नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल?
कारला *ब्रेक* आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छीत स्थळी पोहोचू शकता.

      जिवनातही तुम्हाला पालक, शिक्षक, मित्र, इ. रूपात *ब्रेक्स* मिळतात. ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला चिड आणतात.
परंतू लक्षात ठेवा जिवनात वेळोवेळी आलेल्या अशा *ब्रेक्समुळेच* तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे *ब्रेक्स* नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.

म्हणूनच जिवनात अधूनमधून येणाऱ्या अशा *" ब्रेक्सची "* जाण ठेवा. त्यांचा योग्य वापर करा.

Thursday 8 March 2018

*१. गगनभरारीचं वेड*
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
*२. झुंज*
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
*३. कॅलेंडर*
भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.
*४. संघर्ष कुठपर्यंत?*
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
*५. पडावं तर असं!*
आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.
*६. परिपूर्णता?*
जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
*७. नको असलेला भाग*
दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.
*८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ*
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
*९. समस्या*
अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.
*१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?*
प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.
*११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान*
समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.
*१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'*
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.
*१३. पळू नका*
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.
*१४. पाठीची खाज*
पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..
*१५. माफी*

माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.
*१५. खर्च-हिशोब*
खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.
*१६. गैरसमज*
गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो.
*१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान*
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
*१८. अपेक्षा-ऐपत*
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.
*१९. अपयशाची भीती*
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.
*२०. खरी शोकांकिका:*
बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.
*२१. कौतुकाची खुमारी*
कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.
*२२. झरा आणि डबकं*
वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
*२२. कागद-सर्टिफिकेट*
सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.
*२३. रातकिड्याचा आवाज*
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.
*२४.फुगा किती फुगवायचा?*
एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.
*२५ हरवण्यासारखं घडवा*
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!

Wednesday 7 March 2018

🌹   *चार   किंमती  रत्ने*
          पाठवित  आहे    🌹
( पूर्ण  'विश्वास'  आहे  मला   की,  तुम्ही  ह्याने  नक्कीच  'श्रीमंती'   मिळवाल.  )
    💥   पहिले   रत्न    💥
           💫  *माफी*  💫
    तुमच्याबद्दल   कोणी  काहीही  बोलले तरी  ते
 मनाला  लावून  न  घेता,  'माफ'  करा.
        💥 दुसरे  रत्न  💥
           💫  *विसरा*  💫
       दुसर्यांवर  केलेले  उपकार  विसरा.  फळाची  अपेक्षा  करु  नका.   'निःस्वार्थ'  भावना  ठेवा.
       💥  तिसरे  रत्न 💥
          💫  *विश्वास*  💫
        नेहमी  'स्वकष्ट'  आणि  'ईश्वरावर'  अतूट  विश्वास  ठेवा.    हीच  तुमच्या  यशाची  पावती  असेल.
      💥  चौथे  रत्न   💥
         💫   *वैराग्य*  💫
        नेहमी  लक्षात  ठेवा  की,  'जन्म'  आणि  'मरण'  कधीच  कुणालाच  चुकलेले  नाही.  'जन्म'  घेतला  म्हणजे  'मृत्यु'  अटळ  आहे.  वर्तमानात  जगा.   कोणत्याही  गोष्टींचे  दुःख  कुरवाळित  बसू  नका.  'जीवन'  खूप  सुंदर  आहे.
             *🙏🙏*

Tuesday 6 March 2018

*'सर' शब्दाची लाज वाटते*
काय सर? काय चाललंय? या साध्या प्रश्नाला समोरून उत्तर आलं. सर, तेवढं म्‍हणू नका ओ, शिवी दिल्यागत वाटतंय. एवढी सर या शब्दाची चीढ बघून थोडंसं विशेष वाटलं.  पण, एका तासिका तत्त्‍वावर प्राध्यापकी (हमाली) करणार्‍या प्राध्यापकाची व्यथा ऐकून या 'सर' शद्बाबद्दल त्यांच्या मनात एवढा राग का? याचे उत्तर मिळाले.
घरची परिस्‍थिती बेताची असताना, स्‍वत:च्या कष्‍टावर उच्‍च शिक्षणापर्यंत मजल मारली. कधीतरी शिक्षक व्‍हायचं स्‍वप्‍न उराशी बाळगलं होतं. त्यासाठी लागणार्‍या सर्व पदव्या मिळवल्या. पण, आजपर्यंतही सन्‍मानाने 'सर' म्‍हणवून घ्यायची लाज वाटते. अशा शब्दात एक उच्‍च विद्याविभूषित तरूण बोलत होता.
पाचवीपासून ते एमएच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सरकारने जे कॉलिफिकेशन ठरवून दिले. ते सर्व पूर्ण केलं. बीए केलं. बीएड केलं. एमए, सेट, नेट, पीएच.डी सुद्धा केली.  प्राध्यापक नाही तर, शिपायाची तरी नोकरी मिळेल अशी आशा घेऊन वाटच बघत राहिलो. सन्‍मानाने जगण्यासाठी कोणते कॉलिफिकेशन आहे. तेच समजत नाही, असे तो म्‍हणाला.
गावातील शाळेत दहावी पर्यंतचं शिक्षण केलं. उच्‍च माध्यमिक आणि पदवी, पदव्युत्तर शिक्षणही कमवा व शिका योजनेतून केलं. तेव्‍हाच कधीतरी शिक्षक व्‍हायचं स्‍वप्‍न पाहिलं होतं. त्यानुसार सीईटी देऊन एका चांगल्या कॉलेजमध्ये बीएडसाठी प्रवेश मिळवला. चांगल्या गुणांनी बीएड उत्तीर्ण झालो. त्याच काळात राज्य सरकारनं शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू केली. पुन्‍हा आशावादी झालो. आता ही परीक्षा पास झालो की मिळेल नोकरी या भाबड्या आशेनं. 'टीईटी'ही पहिल्याच प्रयत्‍नात पास झालो. त्यानंतर सरकार शांत झालं. माझ्या आशावादी जीवनाचा पुढचा प्रवास सुरूच होता.
एमए, बीएड झालो तरी नोकरी नाही. टीईटीचाही उपयोग नाही. म्‍हणून शेतात कामाला जाण्यास सुरूवात केली. शिक्षक होण्याची इच्‍छा स्‍वस्‍थ बसू देत नव्‍हती. पुन्‍हा सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा 'सेट' व 'नेट'ची तयारी सुरू केली. दरम्यान, पीएच. डीला प्रवेश घेऊन डॉक्‍टर होण्याचंही स्‍वप्‍न पाहिलं. केवळ शिक्षण जगवू शकत नाही, त्यामुळे नोकरी शोधतच होतो, असा प्रवास तो सांगत होता.
एका खासगी महाविद्यालयात तासिका तत्त्‍वावर रूजू झालो. दरम्यान, राज्य सरकारनं शिक्षक भरतीसाठी पुन्‍हा अभियोग्यता चाचणी घेण्याचे ठरवलं. एवढं सगळं झाल्यावर ती परीक्षाही दिली. त्याचंही असंच झालं. पुढं काय झालं समजलंच नाही. सध्या मानधन मिळतंय ७ हजार रुपये. तेही  त्या त्या महिन्याला नाही. निम्‍मी रक्‍कम महिन्याला मिळते आणि उर्वरित वर्षाच्या शेवटी. तर मग तुम्‍हीच सांगा. ३ ते ४ हजार रुपयांत आयुष्याची २७-२८ वर्षे शिक्षणात घालवलेल्या तरुणाने करायचे काय? आणि जगायचं कसं? त्याचा हा प्रश्न विचारात पाडणारा होता.
प्राध्यापक म्‍हणून राहायचं म्‍हटलं तरी पदरमोड करावी लागते. एवढं शिकूनही घरी पैसे मागून राहावं लागतं. कधी कधी जगण्याचीही लाज वाटते. गावी गेलं तरी लोक विचारतात. काय कराताय सर? झालं का नाही शिक्षण? अजून किती राहिलंय शिकायचं? मग याच 'सर' शब्‍दाची लाज वाटते. एवढंच नाहीतर कुणी सर म्‍हटलं तर तो सन्‍मान नाही तर शिवी वाटते, असे सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी आले.
शिक्षण व्यवस्‍थेचे आणि शिक्षणाचे वास्‍तव सांगत होता, एक उच्‍च विद्याविभूषित तरुण. शिक्षक होण्यासाठी झगडणारा आणि शिक्षक होण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण. कदाचित थोड्याफार फरकाने असेच आशादायी तरुण राज्यात अनेक आहेत. शिक्षक होण्यासाठी पैसे भरण्याची ऐपत नसलेले.

Monday 5 March 2018

आयुष्यात प्रेम केल होत,
कुणालातरी आपल आयुष्यच
देऊ केल होत...
म्हणतात, प्रेम करण सोप
असत ते व्यक्त करण कठीण
असत, प्रेम पहाण सोप
असत, ते समजून घेण कठीण
असत...
आणि हेच समजून घ्यायच
होत, म्हणून, आयुष्यात प्रेम
केल होत, कुणालातरी आपल
आयुष्यच देऊ केल होत...
असतो का प्रेमात खरच
आनंद का नुसतच "I Love U"
म्हणायच असत?
विरहात त्याच्या बुडून
मरायच असत की फक्त
"I Miss U" म्हणायच असत?
हेच बघायच होत म्हणूनच
आयुष्यात प्रेम केल होत,
कुणालातरी आपल आयुष्यच
देऊ केल होत...
म्हणुनच तिच्याजवळ
व्यक्त करण ठरवल,
आणि व्यक्तही केल होत
पण...
त्याला "माझ तुझ्यावर
प्रेम नाही" असं
म्हणायला काहीच वाटल
नव्हत, असतात खरच
अशी माणस या जगात हे
कधी मी पाहील नव्हत...
झगडत होते त्याच्याकडून ते
"I Love You" हे तीन शब्द
ऐकण्यासाठीकधी,
त्याच्या आठवणीत मरत होते,
तर कधी मरुनच जगत होते...
आणि कदाचित हेच
माझ्या मनाला अनुभवयाच
होत...
म्हणूनच आयुष्यात प्रेम केल
होत, कुणालातरी आपल
आयुष्यच देऊ केल होत...

Sunday 4 March 2018

तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्‍याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरिता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’ बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो... अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो... त्यावर माणसे ठाम असतात...  खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते... विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे... म्हणजे मग तो विकसित होतो... जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात... ‘माणूस’ समजणे सोपे जाते...
दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही... एकच ध्येय असलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे... अर्थात चुकीचे दृष्टिकोन....
म्हणूनच ‘नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे’ असे म्हणतात…
________✍​

Saturday 3 March 2018

एकदा कुत्र्यात अन गाढवात
 पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
 तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,
कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .
कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .
शर्यत सुरु झाली
कुत्रा जोरात धाऊ लागला.
 पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,
असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला
तर बघतो
तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते
तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून
निराश झालेला कुत्रा बोलला कि
जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते
             *तात्पर्य काय*
१.आपल्याना विश्वासात घ्या
२.आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य करा,त्याना प्रोत्साहन  द्या
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा
           आपली_माणसं_मोठी_करा.     👍👍👆​​​👆​​​

Friday 2 March 2018


नवरा बायको एकत्र बसून नॅशनल जिओग्राफि चॅनल पाहात होते........
बायको -  मला भिती वाटतेय, आता तो चित्ता बिचाऱ्या हरणाला पकडून  बहुतेक मारून खाणार ?
नवरा  -  अग हा तर निसर्गनियम आहे.
"जिवो जीवस्य जीवनम्।"
बायको -  please,  काहीतरी करा ना ,,,,.
नवरा - अग मि काय करू शकतो???
बायको -  हे पहा,,,, आत्ताच सांगते,,,,  जर का त्या चित्याने हरणाला मारून खाल्ले तर,,, तर,,,, तुम्हाला मला रोज शॉपिंगला न्याव लागेल,,,,,
दररोज कॅंडल लाईट डिनर द्यावा लागेल,,,,,, आणि ,,,आणि,,,, माझी आई अगदी कायमची आपल्याकडे राहायला येईल ,,,,,,,,,,,,,
.............आता तुम्ही या पुढची स्टोरी या व्हिडीओ मध्ये पहा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Thursday 1 March 2018

*कष्टाची भाकरी गोड लागली...*
*लुटावे कुणाला कधी जमलेच नाही...*
*चेहरा आरशासारखा स्वच्छ होता,*
*मुखवटा लावणे जमलेच नाही...*
*जे लाभले ते आनंदाने स्वीकारले,*
*कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही...*
*जीवन साधे सरळ आहे...*
*भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही...*
*प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोट बांधली*
*आजपर्यंत काही कमी पडलेच नाही...*